About us

Join us FREE!

Chatrapati 🙏🙏🚩🚩🚩

Blog by Ranjit Surekhrao Desai connectclue-author-image

All > History > Chatrapati

1 like

Please login to like this article.

connectclue-linkedin-share

" कोणावरी चालून जाऊंन तुंबळ युद्ध करून रणास आणिले, कोणावरी छापे घातले, कोणास परस्परे कलह लाऊन दिल्हे, कोणाचे मित्रभेद केले, कोणाचे डेरीयात सिरोन मारामारी केली, कोणासी येकांगी करून परभिवले, कोणासी स्नेह केले, कोणाच्या दर्शनास आपण होऊंन गेले तर कोणास आपले दर्शनास आणिले, कोणास दगे करविले. यैसे ज्या ज्या उपाये जो जो शत्रु आकळावा तो तो शत्रु त्या त्या उपाये पादाक्रांत करून शताविधि कोटकिल्ले, तैसिच जलदुर्ग व कित्येक विषम स्थळे हस्तगत केली  "

आज्ञापत्रातील हे वर्णन छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनितीचे वैशिष्ट दर्शवतात. मोगलांची प्रचंड साधने आणि महाराजांचे मर्यादित मनुष्य आणि संपत्ती बळ या पार्श्वभूमीवर महाराजांची युद्धनीति उठून दिसते. छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल आणि कसलेले असे सेनापती तर होतेच पण त्याच बरोबर ते युद्धाच्या राजकीय, सामाजिक अंगांचे उत्कृष्ट तज्ञ होते. उघड हल्ला केंव्हा करावा, माघार केंव्हा घ्यावी, शत्रूच्या हलचाली केंव्हा व कशा थांबवाव्या, शत्रुत आपसात कलह कसे लावावे हे सर्व युद्धनितीचे पायंडे महाराजांनी कसे वापरले होते हेच या वर्णनातून दिसून येते ..
______________________________________

राजनीतिधुरंदर, रणनीतीधुरंदर छत्रपती शिवाजी महाराज यांचा विजय असो ..

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


connectclue-linkedin-share

More articles:


Recent lost & found:


Login for enhanced experience

connectclue-tick Create and manage your profile

connectclue-tick Refer an author and get bonus Learn more

connectclue-tick Publish any lost and found belongings

connectclue-tick Connect with the authors & add your review comments

connectclue-tick Join us for Free to advertise for your business or Contact-us for more details

connectclue-tick Join us for Free to publish your own blogs, articles or tutorials and get your Benefits

connectclue-login

Back to top