About us

Join us FREE!

🚩🚩🚩Chatrapati 🚩🚩🚩

Blog by Ranjit Surekhrao Desai connectclue-author-image

All > History > Hidavi swarajya

1 like

Please login to like this article.

connectclue-linkedin-share

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो 🙏🚩🚩 

* या युगी सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा असता मऱ्हाठा पातशहा एवढा छत्रपती झाला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही.
 - सभासद 

* सिंहासनारूढ होऊन छत्र धरून छत्रपती म्हणविले. केवल नूतन सृष्टीचं निर्माण केली.
 - आज्ञापत्र

* राष्ट्रनिर्माता म्हणून मान्यता पावणे यासारखे मनुष्याच्या आयुष्यात अन्य कोणतेही श्रेष्ठ विधिलिखित असू शकत नाही; नेमके हेच महतकृत्य शिवाजी महाराजांनी करून दाखवले आहे.
 - जदुनाथ सरकार

* शिवाजी महाराजांनी हिंदू समाजाचा सुकत आलेला वृक्ष पुनरुज्जीवित केला ही भरतखंडास अभिमानास्पद कामगिरी घडली. राज्याभिषेक नसता तर हिंदुमात्राची सहानुभूती राजारामकालीन संकटसमयी मराठ्यांस लाभली नसती. आपल्या अनुयायांत श्रद्धा निर्माण करणे हे शिवाजी महाराज यांचे स्वराज्यरक्षणासाठी आद्य कर्तव्य होते; व ती गोष्ट राज्याभिषेक शिवाय अन्य कोणत्याही उपायाने सध्या झाली नसती.
- शेजवळकर 

* हिंदवी स्वराज्य ही अत्यंत महत्वाची व आवश्यक क्रांती झाल्याने भारतात हिंदू समाजाला जगता आले. त्यामुळे शेवटी इस्लामी सत्तांना नामोहरम होऊन राहावे लागले हाच सर्वात मोठा सामाजिक विक्रम होय. हा विक्रम शतकानुशतके भारतीय जनतेच्या स्मरणातून दूर जाणार नाही.
- वा. सी. बेंद्रे

* स्थापन केलेले राज्य हे खऱ्या अर्थाने कल्याणकारी ठरावे,  आपल्या जनतेचा सर्वांगीण विकास व्हावा, आपले सांस्कृतिक जीवन समृद्ध व्हावे आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे राष्ट्राची अस्मिता जागृत व्हावी यासाठी महाराजांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा, ही सर्व पाहता त्यांचे आयुष्य म्हणजे समकालिकांना एक चमत्कार तर वाटलाच, पण आजतागायत भारतातील पिढ्या त्यांच्या चरित्राने भारावून गेल्या आहेत.
- सेतुमाधवराव पगडी 

* शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हे सर्व भारतभर पसरलेल्या प्रजेला आपण तुमचे मुक्तीदाते अहोत, , आणि रक्षणकर्ते आहोत असे आश्वासन होते. हे माझे राज्य आहे, ते मला टिकवलेच पाहिजे, या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली ती शिवाजी महाराज यांच्या राज्यासाठी. भारताच्या इतिहासात अशी ज्योत जनतेच्या मनात शिवाजी महाराजांनी प्रथम पेटवली म्हणून शतकानुशतके लोक त्यांना आपला त्राता, उद्धारकर्ता मानत आले. कोणत्याही शतकातील जनतेच्या मनात असणाऱ्या प्रबळ स्वातंत्र्याकांक्षेचा शिवाजी महाराज हे प्रतिनिधी ठरले.
- नरहर कुरुंदकर

पौरुषता के परंपरा का महापराक्रमी राजा था।
और पुनराभिषिक्त होने वाला,
यह राष्ट्रपुरुष शिवराया था।
यह राष्ट्रपुरुष शिवराया था।

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩


All review comments

Jai Shivaji maharaj
connectclue-linkedin-share

More articles:


Recent lost & found:


Login for enhanced experience

connectclue-tick Create and manage your profile

connectclue-tick Refer an author and get bonus Learn more

connectclue-tick Publish any lost and found belongings

connectclue-tick Connect with the authors & add your review comments

connectclue-tick Join us for Free to advertise for your business or Contact-us for more details

connectclue-tick Join us for Free to publish your own blogs, articles or tutorials and get your Benefits

connectclue-login

Back to top